नीतिवचनं १७:१-२८

  • चांगल्याची परतफेड वाइटाने करू नका (१३)

  • भांडण पेटण्याआधीच निघून जा (१४)

  • “खरा मित्र नेहमी प्रेम करतो” (१७)

  • “आनंदी मन हे उत्तम औषध आहे” (२२)

  • “ज्ञानी माणूस आपले शब्द आवरतो” (२७)

१७  भांडणं असलेल्या घरात मेजवानी* करण्यापेक्षा,+शांती* असलेल्या घरी कोरड्या भाकरीचा तुकडा खाल्लेला बरा!+  २  सखोल समज असलेला नोकर निर्लज्जपणे वागणाऱ्‍या मुलावर अधिकार चालवेल;मालकाच्या मुलांसोबत त्यालाही संपत्तीचा वारसा मिळेल.  ३  सोनंचांदी शुद्ध करण्यासाठी आगीत टाकतात,+पण हृदयांचं परीक्षण करणारा यहोवा आहे.+  ४  दुष्ट माणूस दुखावणारे शब्द लक्ष देऊन ऐकतो,लबाड माणूस दुसऱ्‍यांची निंदा ऐकतो.+  ५  गरिबाची थट्टा करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+आणि दुसऱ्‍याचं संकट पाहून हसणाऱ्‍याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही.+  ६  नातवंडं* वृद्धांचा मुकुट असतात,आणि वडिलांमुळे* मुलांचा गौरव होतो.  ७  शहाण्यासारखं* बोलणं मूर्खाला शोभत नाही,+मग खोटं बोलणं शासकाला* कसं शोभेल?+  ८  भेटवस्तू देणाऱ्‍याला ती मौल्यवान रत्नासारखी वाटते;+तो जिथे जाईल, तिथे त्याला तिच्यामुळे यश मिळतं.+  ९  जो अपराध क्षमा करतो,* तो प्रेम दाखवतो,+पण जो त्याबद्दल सतत बोलत राहतो, तो जिवलग मित्रांची मैत्री तोडतो.+ १०  मूर्खाला शंभर फटके मारूनही जो परिणाम होत नाही,+तो समजशक्‍ती असलेल्या माणसाला एकदाच रागावल्याने होतो.+ ११  दुष्ट माणूस फक्‍त बंड करण्याची संधी शोधत असतो,पण त्याला शिक्षा देण्यासाठी क्रूर दूताला पाठवलं जाईल.+ १२  मूर्खपणात गुरफटलेला एखादा मूर्ख भेटण्यापेक्षा,जिची पिल्लं पळवून नेलेली आहेत, अशी अस्वलीण समोर आलेली बरी.+ १३  जर एखाद्याने चांगल्याची परतफेड वाइटाने केली,तर त्याच्या घरावर संकटं येत राहतील.+ १४  वाद सुरू करणं हे धरणाचे दरवाजे उघडण्यासारखं* आहे. भांडण पेटण्याआधीच तिथून निघून जा.+ १५  दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा,+अशा दोघांचीही यहोवाला घृणा वाटते. १६  मूर्खाकडे बुद्धी मिळवण्याची संधी असूनही,ती मिळवण्याची त्याला इच्छाच नसेल, तर काय उपयोग?+ १७  खरा मित्र नेहमी प्रेम करतो;+दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.+ १८  समज नसलेला माणूस हात मिळवतोआणि एखाद्याचं कर्ज फेडण्याची आपल्या शेजाऱ्‍यादेखत हमी देतो.*+ १९  ज्याला भांडण्याची हौस असते, त्याच्याकडून चुका होतीलच!+ जो आपलं फाटक उंच बांधतो, तो नाशाला आमंत्रण देतो.+ २०  कपटी मनाच्या माणसाला यश मिळणार नाही,+आणि जो लबाडपणे बोलतो तो संकटात सापडेल. २१  मूर्खाला जन्म देणारा बाप दुःखी होईल,बेअक्कल मुलाच्या पित्याला सुख नसतं.+ २२  आनंदी मन हे उत्तम औषध आहे,*+पण दुःखी मनामुळे शरीरात जोम राहत नाही.*+ २३  न्यायाचा मार्ग बदलण्यासाठीदुष्ट माणूस गुप्तपणे लाच घेतो.+ २४  समंजस माणूस बुद्धीला आपल्या डोळ्यांसमोर ठेवतो,पण मूर्खाची नजर सगळ्या पृथ्वीवर भिरभिरत असते.+ २५  मूर्ख मुलगा आपल्या बापाला शोक करायला लावतोआणि त्याला जन्म देणाऱ्‍या आईचं मन दुखवतो.+ २६  नीतिमानाला शिक्षा देणं* चांगलं नाही;आदरणीय लोकांना फटके मारणं योग्य नाही. २७  ज्ञानी माणूस आपले शब्द आवरतो+आणि समंजस माणूस शांत राहतो.+ २८  शांत राहणाऱ्‍या मूर्खालाही बुद्धिमान समजलं जाईल,आणि तोंड बंद ठेवणाऱ्‍याला समंजस मानलं जाईल.

तळटीपा

किंवा “शांतता.”
शब्दशः “बलिदानं.”
किंवा “नातू.”
किंवा “पालकांमुळे; आईवडिलांमुळे.”
किंवा “चांगलं.”
किंवा “प्रतिष्ठित माणसाला.”
शब्दशः “झाकतो.”
शब्दशः “पाणी बाहेर सोडण्यासारखं.”
किंवा “जामीन राहतो.”
किंवा “आरोग्यासाठी चांगलं आहे.”
किंवा “हाडं सुकतात.”
किंवा “नीतिमानाकडून दंड घेणं.”